लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिवती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुन आलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य यांचा माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या माध्यमातून व त्यांच्या प्रमुख उपस्थिती जिवती तालुक्यातील चिखली,पिटीगुडा नं 2,सोरेकसा तसेच आंध्रप्रदेश सीमेवर असलेला बाबापूर या विविध गावांना भेटू देवून शाल,पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला,तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांनी बोलताना सांगितले जिवती हा तालुका अतिदुर्गम भाग असून अनेक वर्षे पासून या भागात विकास कामात अडथळा निर्माण झाला आहे, मी आमदार असताना या तालुक्यातील अनेक विकास कामाला आपण निधी मंजूर करण्यात आला होता, काही कामे पूर्णत्वास आले होते तर अनेक विकास कामे काही कारणास्तव अडीच वर्षांपासून ठप्प झाले आहे,आता आपले सरकार आले असून ज्या गावांना विकास कामांना निधीची गरज असल्यास त्या गावांना राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याकरिता पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.
याप्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्यासह भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे,बालाजी भुते,पाटण गावचे युवा नेते विठ्ठल चव्हाण,तुकाराम पवार,बालाजी माने,माधव नेवळे, शिवाजी भोईनवाड,चिखली येथील सौ लता केले,अर्जुन केले,अक्षय मेश्राम,चंद्रशेखर आडे,भिकाजी आडे,पिटीगुडा येथील गणेश मुसळे,रामराव राठोड, सोरेकसा येथील भोजु कोटनाके, वामन जाधव,महादेव मडावी,सौ हर्षकला मडावी,बाबापूर( शेडवाही ) येथील जंगु कोटनाके, भीमराव cकोटनाके आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.