मेन राजाराम कॉलेजf स्थलांतरित न करणेबाबत मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन ♦️भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विरोध

 

लोकदर्शन कोल्हापूर👉किरण कांबळे

कोल्हापूर दिनांक 17नोव्हेंबर कोल्हापूर येथील मेन राजाराम कॉलेज, हायस्कूल (ता.करवीर जिल्हा.कोल्हापूर) ही शाळा स्थलांतरित होत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. करवीर संस्थान अधिपती लोकराजा शाहु महाराज यांचे दुसरे राजाराम महाराज यांच्या शैक्षणिक धोरणामुळे संस्थानाच्या राजवटीमध्ये ही शाळा सुरु झाली होती. या शाळेला ऐतिहासिक महत्वाबरोबरच सामाजिक महत्व देखील आहे. या शाळेतुन अनेक गरिब विद्यार्थी शिक्षण घेऊन मोठमोठे अधिकारी झालेले आहे. सध्या याच शाळेमधुन अनेक गोरगरिबांची मुले येथे शिक्षण घेत आहेत. यामुळे या शाळेचे महत्व खुप आहे.
पण अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री मा.दिपक केसरकर यांनी या शाळेची पाहणी करुन येथील शाळा स्थलांतरित करण्यात यावी अशा सुचना केल्या आहेत .असे स्थानिक चौकशी वरून समजत आहे. शाळा स्थलांतरित करुन याठिकाणी यात्री निवास करण्यात येणार आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. या हायस्कूल स्थलांतरित होण्याला भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विरोध आहे.
कोल्हापूर नगरीला छत्रपती शाहु महाराज यांच्या विचारांचा आणि आचारांचा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शाहूजी महाराज यांनी नेहमीच अन्यायाला आळा घातलेला आहे. मेन राजाराम हायस्कूल ही शाळा स्थलांतरित करुन विद्यार्थी व याठिकाणाची ओळख पुसुन समस्त करवीर वासीयांच्यावर प्रशासनाच्या आणि शासनाच्या माध्यमातून अन्याय केला जात आहे.
म्हणून मा.जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन त्यांनी या संबंधित विषयांवर येत्या 48 तासांत लेखी खुलासा करावा अन्यथा या गोष्टीचा निषेधार्थ करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 ला भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मेन राजाराम हायस्कुल समोर बोंममारो आंदोलन करू अशी भूमिका आम्ही घेत आहोत.
हे निवेदन देण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण कांबळे, सागर सुतार,मदन सरदार , निलेश शिंदे ,ओंकार पांढरे आदी पदाधिकारी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *