माजी आमदार संजय धोटे यांचा माणिकगड पहाडावर शेतकरी संवाद

लोकदर्शन प्रतिनिधी – जिवती: 

लोकनेत्यांना क्षेत्रातील जनतेशी संलग्नित राहण्याचा मोह जड़ला असतो. नानाविध जनसेवेच्या माध्यमातून जनसेवा अंगी बाणविण्यासाठी ते उत्सुक असतात.
राजुरा क्षेत्रातील माजी आमदार संजय धोटे यांनी
माणिकगड पहाडावर वसलेल्या हिरापुर ताडी गावात शेतकरी संवाद कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला.  यावेळी संजय धोटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी  शेतकरी बांधवांनी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ काही शेतकऱ्यांना सुरूवातीला मिळाला, परंतु मध्यंतरी हा सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळेनासा झाला. ही बाब संजय धोटे यांच्या कानी पडताच त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी वर्गाची कानउघाडणी करून कार्यवाही केली. यावेळी इतरही समस्यांचे निराकरण त्यांचेकडून झाले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश केंद्रे, बालाजी भुते, संजय पवार,अनुलोम चे सतीश मुसळे, स्थान मित्र सुहास सेलघर,अनिल दुबे,तिरूपती केजगिर,सिध्दु सलघर,दुदम बाजगिर, गायकवाड भाऊ, सखाराम सपुरे, सुभाष सलघर,दत्ता प़ोळे यांचे सह गावातील शेतकरी बांधव तरूण मंडळी मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here