सर्वसामान्यांचे शोषण करणाऱ्या केंद्र सरकारला धडा शिकवा. नगराध्यक्ष अरुण धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा  :– 27 सप्टेंबर


केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, सुशिक्षित युवक, गोरगरीब जनता विरोधी सरकार असून शेतकरी समस्या, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, सुशिक्षित युवक, गोरगरीब जनता विरोधी सरकार असून शेतकरी समस्या, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यात अयशस्वी ठरले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, इंधनदरवड, गॅस, खाद्यतेल दरवाढ व महागाईच्या मुद्द्यावर जनतेत तीव्र असंतोष आहे. सर्व सामान्यांचे शोषण करणाऱ्या केंद्र सरकारला जनतेने धडा शिकवावा. देशातील जनता समस्यांचा सामना करत असताना झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठीच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या सुचनेनुसार आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या चारही तालुक्यांत शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला पूर्ण पाठिंबा देत हा बंद पाडण्यात येत आहे असे मत नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी राजुरा येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनता वैतागली असून यानंतरही सरकारला जाग आली नाही तर भविष्यात पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे यांनी दिला. तर शेतकरी संकटात असताना स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे नेते आणि कार्यकर्त्ये सोईच्या भुमिका घेऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करीत आहेत असे मत व्यक्त केले. या प्रसंगी राजुरा येथे शहरामध्ये बाईक रॅली काढून व्यापारी प्रतिष्ठानांना बंद पाडण्याचे काँग्रेसने आवाहन केले. या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत बंद उत्स्फूर्तपणे पाडला. या प्रसंगी शहरातील संविधान चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा महत्त्वाच्या ठिकाणी धरणे देऊन शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून बंद पाडण्यात आले. या प्रसंगी राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, सेवादलाचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महीला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सं. गां. नि. योजना अध्यक्ष साईनाथ बतकमवार, अशोकराव देशापंडे, ॲड. सदानंद लांडे, अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष सब्बीर पठाण, जि.प. सदस्य मेघाताई नलगे, महीला सेवादल च्या अध्यक्षा अर्चना गर्गेलवार, उपसभापती मंगेश गुरनुले, माजी सभापती तथा प.स. सदस्या कुंदाताई जेणेकर, नगरसेवक गिता रोहणे, दीपा करमनकर, साधना भाके, गजानन भाटारकर, हजित सिंग संधू, आत्मा समितीचे अध्यक्ष संतोष इंदुरवार, कवडू सातपुते, विकास देवाळकर, लहू चाहारे, शामराव कोंटनाके, जांगुपाटील येडमे, सर्वांनद वाघमारे, ॲड. चंद्रशेखर चांदेकर, ॲड. मारोती कुरवरकर, पंढरी चान्ने, अविनाश जेणेकर, मारोती बोडेकर, सरपंच रामभाऊ देवईकर, उपसरपंच नीलकंठ खेडेकर, शंकर गोनेलवार, सरपंच शोभा मडावी, उपसरपंच आकेश चौथले, संदीप आदे, राजू पिंपळशेंडे, उमेश मिलमिले, सुमित्रा कुचंकर, संगीता मोहूर्ले, शुभांगी खमणकर, पुनम गिसावळे, नंदाताई गेडाम, सुप्रिया गेडाम, वनिता मुन, कामिनी उईके, विनाताई गोप, मनोहर धुडसे, साबीर सय्यद, अनंता ताजणे, मधू सोयाम, शिवराम लांडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, आकाश मावलीकर, शाहानवाज कुरेशी, प्रणय लांडे, नीरज मंडळ, सारंग गिरसावळे यासह अनेक कार्यकर्ते युवक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *