आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा रास्ता रोको* *बांधकाम विभागाला प्रहार चा ईशारा*.

लोकदर्शन👉 मोहन भारती

गडचांदुर :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या धानोरा -भोयेगाव ,गडचांदुर- जिवती रस्त्याचे काम सुरू झाले मात्र गडचांदुर येथील पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनीगेट पर्यंतच्या रस्त्याचे काम एकतर्फी रस्ता खोदून एक वर्षापासून अत्यंत संथ गतीने करण्यात येत आहे .तसेच या मार्गाने माणिकगड सिमेंट कंपनीची जड वाहने या रस्त्याने येजा करत असल्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो . त्यामूळे या रस्त्याचे काम तीव्र गतीने पूर्ण करावे असे न झाल्यास प्रहार आंदोलन करेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी तालुका प्रमुख सतीश बिडकर यांनी निवेदनातून दिला आहे.

या रस्त्याने प्रवाशांची नेहमी वर्दळ असते अशातच एक तर्फी रस्त्याचे बांधकाम होऊन त्याचे अर्धवट काम झाले असल्याने आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेक जीव सुद्धा गेले व अनेक नागरिक गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले त्याकरिता येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात करावी व तात्काळ रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास नेणे व एक तर्फी रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सपाट करण्यात यावा असा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सतीश बिडकर, पंकज माणूसमारे,सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, अरविंद वाघमारे, महादेव बिस्वास, अनुप राखुंडे सूरज बार, नितेश कोडापे, व अन्य कार्यकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे . जर काम सुरू नाही झाले तर आठ दिवसानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा निवेदनातून प्रहार तर्फे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक चंद्रपूर व सहाय्यक कार्यकारी अभियंता गडचांदुर जिल्हाधिकारी चंद्रपूर उपविभागीय अधिकारी राजुरा पोलीस निरीक्षक गडचांदुर यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here