माणिकगड सिमेंटच्या वायु प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By : Mohan Bharti

गडचांदूर :  गडचांदूर शहरात असलेली जुनी माणिकगड सिमेंट कंपनी व सध्याची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी फार मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण करीत असून कंपनी प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे. या कंपनीच्या वायुप्रदूषणामुळे गडचांदुरातील व परिसरातील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट झालेली आहे. तसेच वायू प्रदूषणामुळे येथील नागरिकांना विविध रोगांनी ग्रासलेले आहे. या गंभीर बाबीची कोणीही दखल घेताना दिसत नाही. आज पहाटे ६.३० वाजताच्या दरम्यान कंपनी मधून फार मोठ्या प्रमाणात धूर बाहेर सोडण्यात येत असल्याचा फोटो ई-मेल द्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविण्यात आला आहे.

, कंपनी व्यवस्थापन व चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर बाबीला जबाबदार असून मुद्दाम याकडे ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा काय स्वार्थ दडलेला आहे ते ठाऊक नाही. त्यामुळे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी गडचांदूरवर पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रा, आशिष देरकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here