पुरात वाहून गेलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत.

0
432

लोकदर्शन 👉 मोहन भारती
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.

राजुरा (ता.प्र) :– दिनांक १३ जून २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे नाल्यांचा अचानक पूर आला होता. देवाला येथील नाल्यात दुपारी ३ वाजताच्या दरम्यान लक्ष्मी विनोद वंगणे वय ८० वर्ष व माधुरी विनोद वंगणे वय ३२ वर्षे या मायलेकी आणि मल्लेश शेंडे यांचा पुरात वाहून मृत्यू झाला होता. त्यात त्याच दिवशी पोलीस विभाग व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आले आणि त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मयत यांचे वारसांना शासनातर्फे ४,००,०००/-(चार लक्ष रुपये) आर्थिक मदत देण्यात येते त्या नुसार माधुरी वंगणे व लक्ष्मी वंगणे यांचे वारस विनोद वंगणे यांना ८ लक्ष रुपयांचे धनादेश तसेच मल्लेश शेंडे यांच्या वारस पत्नी मंगला मल्लेश शेंडे यांना ४ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तासिलदार हरिष गाडे, सभापती मुमताज जावेद, सरपंच लक्ष्मीबाई पंधरे, उपसरपंच अब्दुल जावेद, अध्यक्ष तंटामुक्ति समिती अब्दुल गाणी अब्दुल अहमिद, राधेश्याम कुरमावार, संतोष चेनुरवार, मनीषा अंमुलवार, मधुकर आत्राम, रणू कुळमेथे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here