लोकदर्शन करगणी – आटपाडी 👉राहुल खरात
दि 18 जून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आटपाडी तालुक्यातील वरिष्ट अधिकारी श्री .मनोहर साळूंखे यांचे पिताश्री भगवानराव साळुंखे यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले .
अत्यंत कष्टाळू, जिगरबाज ध्येयवेड्या भगवानराव साळुंखे यांनी गरीबीची भयावह चटके सोसत मुलाबाळांचे संगोपन केले . मुलामुलींना उच्चशिक्षित करणाऱ्या भगवानराव साळुंखे यांचे तीन नातू, नात सुना अमेरिका, दुबई येथे मोठ्या पदांवर कार्यरत आहेत . शेतमजूर शेतकरी असा प्रवास केलेल्या भगवानराव यांना करगणी पंचक्रोशीत सदगुणी सदाचारी सोज्वल शांत संयमी गुणाचे ध्येयवेडे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात असे . त्यांच्या निधना बददल सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी भगवानराव साळूंखे यांच्या मृताम्यास श्रद्धांजली वाहिली आहे .
उच्च पदस्थ मुलगा, चार शिक्षित मुली, जावई, सुन, नातवंडे, नात सूना, परतवंडे असा मोठा परिवार आहे . वयाच्या ८५ व्या वर्षी निधन पावलेल्या भगवानराव साळुंखे यांच्या तिसऱ्या दिवशीच्या रक्षा विसर्जनाचा धार्मिक विधी उदया दि .१९ जुन रोजी सकाळी ८ वाजता करगणी ओढपात्रातील स्मशानभूमी येथे होणार आहे .