लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महाराष्ट्र शासनाने 4 ऑक्टोबर पासून कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार स्थानिक महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ने शासन निर्णय ची अंमलबजावणी करत प्रवेशद्वार वर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, मुख्याध्यापीका,सौ,स्मिता चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे,एम,सी,व्ही, सी,विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, तथा इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती,शिक्षकानी कोरोना नियमांचे पालन करत अध्यापन केले,