रखडलेल्या भेंडारा, डोंगरगाव आणि सोनापुर टोमटा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५० कोटीचा निधी उपलब्ध करा.

आमदार सुभाष धोटे यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी.

By : Mohan Bharti

राजुरा :– राजुरा मतदार संघ हा आदिवासी बहुल, नक्षलप्रभावीत, जंगलव्याप्त व दुर्लक्षीत दुर्गम भागांनी वेळलेला आहे. या क्षेत्रातील तालुक्यांमध्ये शेतकन्यांना सिंचनाची सोय निर्माण करण्यासाठी राजुरा तालुक्यातील भेंडारा मध्यम प्रकल्पाला सन १९९० मध्ये मंजुरी मिळाली व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला सन १९७७ साली मंजुरी मिळाली आणि गोंडपिपरी तालुक्यातील सोनापुर टोमटा उपसा सिंचन योजनेला सन १९९१ मध्ये मंजुरी मिळाली आहे. या सर्व प्रकल्पांच्या कामांना जवळपास ३० वर्ष पुर्ण होऊनही सदर प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली नाही. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या तिन्ही प्रकल्पांचे रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली आहे.
अद्यावत परिस्थितीचा आढावा घेतला असता निधी अभावी प्रकल्पांची कामे पूर्णत्वास आली नसल्याबाबतची माहिती समोर आली. भंडारा प्रकल्पाची बरीचसी कामे अपूर्ण आहेत, सोनापुर टोमटा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्था कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. तसेच डोंगरगाव मध्यम प्रकल्पाची बरीचसी कामे अपूर्ण आहेत. ३० वर्षाच्या कालावधी नंतरही सदर प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाचे धोरना विषयी असंतोष पसरत आहे. सदर प्रकल्पांची उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथे सिचंन सुविधे अभावी स्थानिक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून शेती करावी लागते, अनेकदा नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतक-यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. तरी राजुरा मतदार संघातील निधी अभावी रखडलेल्या भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापुर टोमटा उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची कामे पूर्ण करणेसाठी ५० कोटी रू निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात सिचंन सुविधा उपलब्ध होतील, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होतील. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल यासाठी या तीनही प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर प्राधान्य देऊन पुर्ण करण्याची गरज आमदार सुभाष धोटे यांनी स्पष्ट केली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *