जिवती नगर पंचायत कायमस्वरूपी ‘मुख्याधिकारी’ च्या प्रतीक्षेत

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
====================
◆ नगरपंचायत क्षेत्रातील
नागरिकांची मागणी

◆ अनेक महत्वाची रिक्त पदे
तत्काळ भरण्याची मागणी
====================

जिवती :(ता प्र)
– जिवती नगरपंचायत ची स्थापना १७ जुन २०१५ ला झाली. आता याच अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नगर पंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचे कामकाज विस्कळित सुरू आहे. विविध विकासकामांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नागरिकांना दैनंदिन विविध नोंदींसह विविध दाखल्यांसाठी कार्यालयात तासन्‌तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. याला नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी दुजोरा देत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार तालुका क्षेत्र म्हणून १७ जुन २०१५ रोजी जिवती ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. माजी मुख्याधिकारी कविता गायकवाड यांची बदली झाल्यामुळे १५ जानेवारी २०२२ पासून येथील मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, त्यांची गडचांदूर नगरपरिषद व जिवती नगरपंचायतीचा कार्यभार सांभाळताना कसरत होताना दिसत आहे.

जिवती नगरपंचायतीत अनेक कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना, सध्या निम्या कर्मचाऱ्यांवर नगर पंचायतीचा कारभार सुरु आहे. नगर पंचयात स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत त्यात स्वछता निरीक्षक, गाळणी चालक, पंप ऑपरेटर, तारतंत्री, मुकादम, लेखापरीक्षक, स्थापत्य अभियंता, नगररचनाकार इत्यादी पदे रिक्त आहेत व इतर ही अनेक पदे अद्यापही भरली गेली नसल्यामुळे संबंधित विभागाचे कामकाज करताना अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासनाने नगरपंचायतीमध्ये या पदांची तत्काळ भरती करावी, अशी मागणी नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून अनेक विकासकामे करण्यात आली. त्यात नाल्या सफाई, सी सी रस्ते बनविणे, इत्यादी अनेक कामे होत असली, तरी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे नगरपंचायती मार्फत नवीन नळ पाणीपुरवठा योजना, नगरपंचायत अंतर्गत सिमेंट काँक्रिटचे रस्ते, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त शहर आदी प्रमुख योजना व इत्यादी अनेक दुसऱ्या योजना राबवण्यात कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अडचण येत आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून नगरविकास विभागाने इथे तातडीने कायम मुख्याधिकारी द्यावा. अशी मागणी नगरपंचयात क्षेत्रातील नागरिकांतून होताना दिसत आहे.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *