आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभेत मांडल्या आदिवासींच्या समस्या.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या समस्या मांडून त्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
आजच्या चर्चेत सहभागी होऊन आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील आदिवासींचे प्रश्न प्रकर्षाने मांडले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे क्षेत्रातील खरे आदिवासी शासकीय योजनेपासून वंचित राहिल्याचे सत्य त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यातील ज्या भागात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे त्या भागात ठक्कर बाप्पा योजना तसेच आदिवासी क्षेत्रातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा रस्ते विकास योजने अंतर्गत शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात येतो मात्र राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर आदिवासी बांधव वास्तव्यास असतानाही येथे तसेच अन्य काही आदिवासी बहुल भागात हा निधी नियमानुसार उपलब्ध होत नाही तो उपलब्ध व्हायला पाहिजे तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी करीता चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्य़ातील नागरिकांसाठी गडचिरोली येथे एकच कार्यालय दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल भागातील नागरिकांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर येथे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन कार्यालय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी करून क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी सरकारने यावर गांभीर्याने विचार करून क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली आहे. यावर आदिवासी विकास विभागाचे मंत्री के. सी. पाडावी यांनी लवकरात लवकर याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून वरील अडचणींचे निराकरण करण्याची हमी दिली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *