By : Shankar Tadas
चंद्रपूर : भारतीय परिवार बचाओ संघटना चंद्रपूर यांचे शिष्टमंडळ पत्नी पीडित पुरुषांची समस्या घेऊन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना भेटले व निवेदन सादर करण्यात आले. विवाहित पुरुषावरही महिला अत्याचार करतात हे आता समाजाला कळायला लागले आहे. त्यावर समाधानकारक, सकारात्मक, व्यापक चर्चा यावेळी करण्यात आली. शिस्तमंडळात भारतीय परिवार बचाओ संघटना चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुदर्शन नैताम, ऍड. धीरज ठवसे, मोहन जीवतोडे, सचिन बरबटकर, नितीन चांदेकर, गंगाधर गुरनुले, वसंता भलमे, स्वप्नील गावंडे, पिंटू मुन आदी उपस्थित होते.
महिलेच्या संरक्षणाकरिता अनेक कायदे आहेत. त्याच कायद्याचा गैरवापर करून पुरुषांना त्रस्त करण्याचे काम पद्धतशीर, योजनाबद्ध रीतीने पत्नी व तिचे आई वडील करतात. कायद्याने हुंडाबळीचा खुळखुळा महिलांच्या हातात दिला आहे. त्याचा गैरवापर करीत अनेक कुटुंब उदध्वस्त करीत आहे. यावर आळा बसायला हवा. पत्नी आपली चूक लपविण्याकरिता पती व ससारचा बळी घेतो.समाजात पुरुषालाच दोष देण्याची पद्धत आहे, परंतु पत्नी घरात काय उपद्व्याप करते हे समाजाला माहीत नसते. त्यात भर टाकतात तिचे आई वडील व मोबाईल. मुलीच्या संसारात आई वडिलांच्या अति हस्तक्षेपामुळे संसार उध्वस्त होत आहे. “हर महिला बेचारी नही, हर पुरुष अत्याचारी नही”. स्त्री पुरुष यांच्या करीता समान कायदे असायला हवे. महिलांना महिला आयोग आहे, बालकल्याण आयोग आहे, जनावराकरिता पशुकल्याण आयोग आहे, परंतु शासनाला पुरुष लक्षात नसावा. त्याच्याकरिताही पुरुष आयोग हवा. सद्यस्थितीत महिलांच्या खोट्या तक्रारी वाढत आहे. त्याची पोलीस प्रशासनाद्वारे सखोल चौकशी करूनच कार्यवाही करावी. एका चुकीच्या निर्णयाने कुटुंब उध्वस्त होण्याची भीती असते. तेव्हा स्त्री पुरुष समान कायदा व पुरुष आयोग व्हावा हीच मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.