वीस वर्षांनी पुन्हा सुरू झाली राजुरा – येरगव्हाण बस

by : K. P. Gatade

कोरपना :

राजूरा – गडचांदूर – येरगव्हाण बस फेरी तब्बल वीस वर्षानंतर  १६ जानेवारी पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची जाण्यायेण्याची अडचण दूर झाली आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत या मार्गावर एकही बस फेरी धावत नसल्याने परिसरातील विद्यार्थी, कर्मचारी नागरिक यांना पायदळ किंवा आपल्या खाजगी वाहनाने जाणे येणे करावे लागायचे. ही अडचण लक्षात घेता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व धानोलीचे उपसरपंच ओम पवार राज्य परिवहन महामंडळाकडे सतत पाठपुरावा करून ही बस उपलब्ध करवून घेतली. या बस मुळे कुसळ , धानोली , तांडा , येरगव्हाण, बोरगाव, सिंगार पठार, कमलापूर , कारगाव, मरकागोंदी , पाकडी गुडा आदी आदिवासी बहुल व अतिदुर्गम भागातील गावाची मोठी गैरसोय दूर झाली आहे. नागरिकांना कोरपना , गडचांदूर, राजुरा या मोठ्या बाजारपेठ स्थानी जाणे येणे सोपे झाले आहे. बाहेर गावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुसळ फाटा पायदळ प्रवास करत जाण्याची अडचण दूर झाली आहे. या बस चे मार्गावरील सर्व गावात स्वागत करण्यात आले. ही बस राजुरा येथून सकाळी अकरा वाजून पाच मिनिट व सायकाळी साडे वाजता या दोन वेळात सुटेल. बस सुरू करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी उपसरपंच ओम पवार व विभाग नियंत्रक , चंद्रपूर, आगार व्यवस्थापक राज्य परिवहन महामंडळ राजुरा यांचे आभार मानले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *