मुंबई – रुग्णांची बेसुमार होणारी लूट, पैसे नाहीत म्हणून वेळेत न मिळणारे उपचार, हॉस्पिटल कडून पैशाअभावी रोखले जाणारे मृतदेह या घडणाऱ्या घटनांमुळे रुग्णांचे हक्क अधिकारावर गदा आणणार्या गंभीर घटना दररोज महाराष्ट्रात घडत असताना इथल्या गरिबांनी पैसे नाहीत म्हणून मरायचं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि म्हणून फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसह विद्यार्थ्यांचे प्रश्न, दररोज स्त्रियांवर होणारे बलात्कार, शेतीमालाला हमीभाव, डॉक्टरांचे संरक्षणाचे प्रश्न, वैद्यकीय साहित्य यंत्रसामग्रीवर सबसिडी दिली पाहिजे, धर्मदाय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांना चाप लावला पाहिजे अशा पद्धतीच्या तेरा प्रमुख मागण्यांसाठी गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी सेंट झेवियर्स कॉलेज पासून रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मुंबईत मंत्रालयावर पीपीई घालून हजारोंच्या संख्येने रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, केंद्रीय कार्यालय सचिव गिरीष घाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, बेरोजगारी वाढलेली आहे. युवकांना उद्योगधंद्यासाठी कोणत्याही बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. दररोज लहान मुलींपासून महिलांवर अन्याय अत्याचाराच्या सामूहिक बलात्काराच्या मन हेलावून टाकणाऱ्या बातम्या कानावर येत आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असला तरी फी मध्ये कोणत्याही प्रकारची कपात करायला शिक्षण संस्थाचालक तयार नाहीत. सोयाबीनला भाव नाही. प्रक्रिया उद्योगाला आणि सर्वसामान्य नागरिकांना एकच भावाने शेतीमाल विकला जात आहे, हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, माणसाच्या आयुष्यातील सुख हिरावून घेऊन दुःख निर्माण करणारे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ सोडविले पाहिजेत, म्हणून गांधी जयंतीदिनी हजारो नागरिकांच्या संख्येने पीपीई किट घालून मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश महामोर्चामध्ये राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.
Related Posts
श्री.नारायण गुरू महाविद्यालयात व्हर्चुअल पार पडले इंटरकॉलेजिएट मीडिया न्यूज रूम वर्कशॉप
दि 9/4/2021 Abp माझा चे वृत्तनिवेGBदक सौरभ कोरटकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद मीडिया हाऊस मध्ये काम करायचे असेल तर त्याआधी मीडिया हाऊस मधील न्यूज रूम चे काम कसे चालते हे माहिती असणे गरजेचे आहे. तेथील…
शेलघर येथे काँग्रेस तर्फे ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबीर उत्साहात संपन्न
लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबाद मंथन शिबिरात विविध ठराव पास उरण दि 12 जून सध्या इतर मागासवर्गीय (ओबीसी )आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा देशभर चर्चीला जात आहे.ओबीसी समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने व ओबीसी समाजाच्या…
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार
By : Shankar Tadas मुंबई : महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकास साठी येथे खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व…