विदर्भ महाविद्यालय जिवती येथील सांस्कृतिक, मराठी व इतिहास विभाग च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘कोरोना काळात शिक्षकांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले . सदर चर्चासत्र आभासी पद्धतीने घेण्यात आले. या चर्चासत्रात मुख्य मार्गदर्शक स्थानावरून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस एच शाक्य यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता कोरोना सदृश्य परिस्थितीत शिक्षक जे कार्य करत आहेत. त्या कार्याची प्रशंसा केली. सोबतच या युद्धजन्य परिस्थितीत इतरही काही घटक जे अहोरात्र परिस्थिती टाळण्याकरिता कार्य करत होती. डॉक्टर, पोलीस, नर्स या सर्वांचे त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केलेत. तसेच शिक्षकांची सुद्धा साथ महत्त्वाची होती. या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेकडे त्यांना प्रत्यक्षात न मिळणाऱ्या ज्ञानात भर, आभासी पद्धतीने मिळवून देणे तसेच त्यांच्या विविध समस्या व शंकाचे निराकरण करणे हे कार्य शिक्षकांने केलेत. या कठीण काळात विद्यार्थ्यांची मानसिकता व आरोग्य सुदृढ ठेवणे सोबतच समाजाला सुद्धा निरोगी, व अफावांपासून दूर ठेवण्यासाठी व ध्येयाप्रत जागृत राहून प्रगतिशील करण्याकरिता महत्त्वाची भूमिका शिक्षकांनी बजावण्याची गरज आहेत असे, प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शाक्य यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्या अनुषंगाने शिक्षक दिन च्या दिवशी चर्चासत्राचे आयोजन प्रा. गजानन राऊत, प्रा. डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राऊत तर समारोप प्रा. देशमुख यांनी केले.
Related Posts
किन्नरांना काम मिळवून पोलीस आयुक्तांनी मानवतेचे दर्शन घडविले.
लोकदर्शन 👉 मोहन भारती *सोलापूर दिनांक :- २५/०२/२०२२ :-* सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री.हरिष बैजल साहेब यांनी तृतीय पंथ किन्नरांना काम मिळवून देऊन मानवतेचे दर्शन घडविले त्यामुळे त्याचे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चांदीची देवीची मुर्ती व…
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू.
लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे उरण दि १७ ऑगस्ट रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडिया (DRT JNPT)येथील सुरक्षा रक्षक गेले ११ महिने कामापासून वंचित होते.त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.त्यासाठी रायगड…
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उथळपेठ येथे २.५० कोटी रु. किमतीचे वाचनालयाचे बांधकाम मंजुर
By : Shivaji Selokar ‘ग्रंथालये ही ज्ञानाची सदावर्ते’ या उक्तीनुसार ग्रंथचळवळीचे महत्व सर्वसामान्य नागरिकांमध्ये रुजावे, वाचनाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असलेले विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल तालुक्यातील उथळपेठ…