काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन उरण तालुका व शहर काँग्रेस तर्फे उत्साहात साजरा

लोकदर्शन उरण.👉विठ्ठल ममताबादे

उरण दि. २८ .काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी एलन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी, आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येवून २८ डिसेंबर १८८५ रोजी इंडियन नेशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली.स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजेच २६ डिसेंबर १९२० रोजी नागपूर मध्ये झालेल्या कॉग्रेसच्या अधिवेशनाने पक्षाला नवसंजिवनी मिळाली. त्यातून स्वातंत्र्या च्या चळवळीला बळ मिळत गेले.काँग्रेस पक्षाच्या चळवळीने, काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान असलेल्या काँग्रेस पक्ष,पक्षाचे विचार व कार्य, पक्षातील नेते, पदाधिकारी यांचे विचार व कार्य येणाऱ्या पिढीला माहिती व्हावे. इतिहासाचे सर्वांना स्मरण राहावे त्या अनुषंगाने भारतात काँग्रेसने वेगवेगळे उपक्रम राबवून आपला १३८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. रायगड जिल्हयात सर्वच तालुक्यात रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवा असे आवाहन काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी केले. स्वातंत्र्य काळातील काँग्रेस पक्षाचे योगदान, पक्षाचे महत्व, कार्यकर्त्यांचे त्याग याबाबतीत प्रकाश पाटील यांनी उपस्थितांना माहिती दिली.

रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात काँग्रेस कार्यालय येथे उरण तालुका व उरण शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक बबन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील, देवीदास थळी , अमिना पटेल, चंदा मेवाती,भालचंद्र घरत, गुफरान तुंगेकर, दिलीप जाधव, हितेंद्र घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *