मुंबई उच्च न्यायालयाने न्हावा शेवा-शिवडी ब्रीजचे जासईचे भूसंपादनच ठरवले बेकायदेशीर. ♦️मात्र निर्णय राखून ठेवण्यात आला. ♦️उद्घाटनाआधीच MTHL ला लागले ग्रहण.

मुंबई उच्च न्यायालयाने न्हावा शेवा-शिवडी ब्रीजचे ज

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि २८ डिसेंबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) ज्याला “शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक” म्हणूनही ओळखले जाते. हा २१.८ किमी लांबीचा ६ लेनचा रोड ब्रीज आहे.जो मुंबईला नवीमुंबईशी जोडणार आहे.हा ब्रीज भारतातील सर्वात लांब सागरी पूल असेल.महाराष्ट्र सरकार,CIDCO आणि MMRDA चा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.आणि लवकरच २०२४ मधे त्याचे उद्घाटन होणार आहे.पण तो वादाच्या भोवर्‍यात अडकणार आहे. भूसंपादन कायदा १८९४ कायद्याअंतर्गत अधिसूचना २००९ मध्ये जाहीर करण्यात आली होती व २०१२ मधे घोषणा प्रकाशित करण्यात आली.दरम्यानच्या काळात “नवीन भूसंपादन व पुनर्वसन कायदा २०१३” केंद्रात मंजूर झाला.तो कायदा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला.बाजारभावाच्या चौपट रोख रक्कम व २०% विकसित भूखंड व ईतर पुनर्वसनाचे अनेक लाभ देणारे असताना सिडको आणि उपजिल्हाधिकरी मेट्रो सेंटर उरण यांनी शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला मिळू नये म्हणून जुन्या १८९४ च्या कायद्यानुसार फक्त ५० हजार रूपये प्रति गुंठा दर निश्चित करून निवाडा जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली.ही फसवणूक करताना घाईगडबडीत त्यांच्याकडून एक चूक झाली.ती अशी कि अंतिम निवाडा बनवताना भूसंपादन कायद्यातील २ वर्षांच्या मुदतीत जाहीर न केल्याने तांत्रिकदृष्ट्या रद्द होत आहे.हेच चिरले गावचे शेतकरी संदेश ठाकूर तसेच ॲड.राहुल ठाकूर,ॲड. सुश्मिता भोईर आणि ॲड.संकेत ठाकूर यांच्या निदर्शनास आले.

हाच धागा पकडून मौजे जासईचे जमीन मालक असलेले चिरले गावचे रहिवासी संदेश विठ्ठल ठाकूर यांनी १७ जमीन मालकांसह १८९४ च्या कायद्यानुसार रद्द होत असलेल्या एकूण ७ हेक्टर १३ गुंठे जमीन असलेल्या निवाड्यालाच आव्हान देण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि २०१७ रोजी कायदेतज्ञ ॲड. राहुल ठाकूर यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली.आणि तब्बल ६ वर्षे न्यायालयीन लढाईनंतर सदर याचिकेवरची अंतिम सुणावणी ०९/१०/२०२३ रोजी जस्टीस कुलाबावाला आणि जस्टीस साठे यांच्या खंडपीठाने २२/४/२०१५ रोजी झालेले हे भूसंपादन निवाडा ॲवार्डच अवैध,बेकायदेशीर असल्याचे शिक्कामोर्तब करून रद्द ठरवले.मात्र निर्णय राखून ठेवला आहे.

आत्ता सदर याचिकाकर्ते शेतकरी जे न्यायालयात गेलेत ज्यांना ५० हजार रूपये प्रतिगुंठा भाव दिला आहे.मात्र आत्ता पुन्हा नव्याने जमीनीचे “नवीन भूसंपादन २०१३” च्या कायद्यानुसार भूसंपादन करावे असे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने जमीन मालकांना २०२३ च्या बाजारमूल्याच्या दुप्पट रक्कम + १००% दिलासा रक्कम म्हणजेच जमिनीच्या बाजारमूल्याच्या ४ पट नुकसान भरपाई म्हणजेच २० ते ४० लाख प्रतिगुंठा मोबदला द्यावा लागेल.तसेच २०% विकसित भूखंड द्यावेच लागतील आणि पुनवर्सनाचे ईतर लाभ द्यावे लागतील.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालानुसार १८९४ च्या जुन्या कायद्याअन्वये सुरू केलेले कोणतेही संपादन जे २०१३ चा नवीन सुरू होईपर्यंत पूर्ण झाले नाही,अशा सर्व प्रकरणांमध्ये २०१३ च्या कायद्यानुसार ४ पट मोबदला मंजूर करून ॲवार्ड,निवाडा जाहीर करणे आवश्यक आहे.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या निकालात दिलेल्या निकालात हे देखील स्पष्ट केले की २०१३ च्या नवीन कायद्यानुसार सर्व भूसंपादन ॲवार्ड २० मार्च २०१५ रोजी पूर्वी जाहीर करणे आवश्यक होते आणि त्यामुळे जमीन मालक संदेश ठाकूर आणि नवी मुंबईचे अधिवक्ता कायदेतज्ञ ॲड.राहुल ठाकूर ॲड.संकेत ठाकूर आणि सुश्मिता भोईर यांनी खंडपीठासमोर अनेक पुरावे सादर केले व आक्रमक युक्तिवाद करून आपली भक्कम बाजू मांडली.महाराष्ट्र सरकार,CIDCO आणि MMRDA च्या दिग्गज वकीलांसमोर लढा दिला त्यांच्या अभ्यासू कौशल्यामुळेच ते यशस्वी झाले आणि माननीय जस्टीस कुलाबावाला आणि जस्टीस साठे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला.मात्र निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (MTHL) साठीच्या जमीन अधिग्रहणाच्या या चुकांमुळे सीलिंकच्या बांधकामात आघाडीवर असलेल्या सिडको आणि एम.एम.आर.डी.ए ला मोठा धक्का बसला आहे.सिडकोला हजारो कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार.हा निवाडा अवैध,बेकायदेशीर आहे हे महाराष्ट्र शासन,सिडको आणि MMRDA या सर्वांना याची कल्पना होती.तसं निवाड्यामधे नमूदही केले आहे.फक्त शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार अधिकचा लाभ चौपट रक्कम मिळू नये व २०% विकसित भूखंड द्यावे लागतील म्हणून सिडकोच्या दबावाखाली महाराष्ट्र सरकारने हा निवाडा जाहीर केला.

अ‍ॅड.राहुल ठाकूर यांनी पुढे माहिती दिली आहे की, या निकालाप्रमाणेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्याही भूसंपादनास आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे व ते भूसंपादनसुध्दा रद्द होण्याची दाट शक्यता आहे.या निकालाने आशा पल्लवित झाली आहे.

याचिकाकर्ते संदेश ठाकूर यांनी भाष्य केले आहे की,प्रकल्प आणि भूसंपादनाच्या नावाखाली सिडको जमीनमालक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.प्रकल्पग्रस्थांचे उपजिविकेचे साधन हिसकावणाऱ्या सिडकोला कोणतेही अंदोलन, मोर्चे न काढता सिडकोने ज्या कायद्याच्या आधाराने नवी मुंबई,उरण,पनवेलच्या शेतकऱ्यांना बर्बाद करून देशोधडीला लावले त्याच कायद्याने धडा शिकवला त्याचा शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे.”सत्यमेव जयते”.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *