लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
प्रेम नगर हे गाव महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत आहेत.या गावाला बसून आज जवळपास 30 वर्ष होत असून आज ही त्या गावात मुल भूत सुविधा उपलब्ध नाही.कारण हा गाव महाराष्ट्र तेलंगणा सिलेंगत असल्याने या गावात घर हे महाराष्ट्र असून त्यांची शेती मात्र तेलंगणा राज्यात आहेत.तरी या दोन राज्याच्या वादात या गावातील नागरिकांनी चांगलीच पिवळनिक होत असल्याचे दिसून पडत आहेत.या गावाला शिक्षण करिता शाळा नाही,अंगणवाडी नाही,पाण्याची सुविधा नाही,रस्ते नाही,तसेच दवाखाने नाही.अश्या कोणत्याच प्रकारे सुख सुविधा नाही.आज महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्य मुळे तेथील नागरिकांना शेतीचे पट्टे आंध्र प्रदेश या राज्याचे देण्यात आले होते पण जेव्हा तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली तेव्हा पासून त्या नागरिकांना शेतीचे पट्टे देण्यात आले नाही. महाराष्ट्र सरकारल आज 43 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या नकाशात हा गाव आज ही अस्तित्वात नाही.तसेच तेलंगणा सरकार सुद्धा या गावाकडे दुर्लक्ष करून राहिले ,ते नागरिक भारताचे असून या दोन राज्याच्या वादामुळे त्या गावातील विकास खुंट त असताना दिसत आहेत.आज भारत स्वतंत्र होऊन 70-80 वर्ष होत असून सुद्धा या गावाचा प्रश्न सुटला नाही,त्या मुळे दोन्ही राज्य या गावाला योजना आखून प्रगती करणे गरजेचे आहेत.