लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नैतिक मूल्ये आत्मसात करण्याची गरज-प्रा.डॉ. संजय गोरे यांचे प्रतिपादन.

लोकदर्शन👉 मोहन भारती


गडचांदूर-लोकशाही जपायची असेल तर ती आपल्या जगण्यात रुजायला हवी. राज्यघटनेत उल्लेख केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्याच्या आधारे ती जगण्यात आणता येईल म्हणून लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नैतिक मूल्ये आत्मसात करण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ संजय गोरे यांनी केले आहे.

शरदराव पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेनिमित्त माझे मत माझे भविष्य- एक मताचे सामर्थ्य या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित एका मताचे सामर्थ्य या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय गोरे बोलत होते ते पुढे म्हणाले लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान नोंदणी करणे व मतदान करणे आवश्यक आहे कायद्याने तर मतदानाचा अधिकार मिळाला मात्र हा अधिकार नैतिक आणि सामाजिकतेने वापरला पाहिजे तरच लोकशाहीचे सक्षमीकरण खऱ्या अर्थाने होईल आणि म्हणून आजच्या तरुणांनी मतदान प्रक्रियेमध्ये व मतदार नोंदणी मध्ये सक्रियतेने सहभाग घेतला पाहिजे.

महाविद्यालययाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ.हेमचंद दुधगवळी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुनील बिडवाईक डॉ. राजेश गायधनी, डॉ. माया मसराम डॉ. सत्येंद्र सिंह, प्रा. मंगेश करंबे व प्रा.जानवे मॅडम इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.दुधगवळी म्हणाले मतदान विवेकी पद्धतीने केले पाहिजे. प्रामाणिक आणि विकास करणाऱ्या प्रतिनिधीला निवडून दिले की लोकशाहीला बळकटी प्राप्त होते. यावेळी संचालन व प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा विशद केली. यावेळी उपरोक्त विषयांवर वकृत्व स्पर्धा व देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली मते प्रभावीपणे मांडली. या कार्यक्रमाचे आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी केले.यावेळी पदवीचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *