लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
धानोरा-गडचांदूर-जिवती-आंध्र प्रदेश ला जोडणाऱ्या चौपदरीकरण रस्त्याचे काम मागील 3 वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरु आहे,
भोयगाव-गडचांदूर-चे काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे,तसेच या मार्गावर अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे, अजूनही अपघात होत आहेत,या मार्गाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे,तेव्हा संबंधित विभागाने तातडीने लक्ष वेधून या महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करून अपघाताची श्रुखला थांबवून दिलासा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कडे दिलेल्या निवेदनात केली आहे