नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विदर्भ सरचिटणीसपदी निवड.

By : Mohan Bharti
राजुरा  :– पंचायत राज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विदर्भ सरचिटणीस पदावर नियुक्ती केली आहे. तसे नियुक्ती पत्र पाठवून त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.
नंदकिशोर वाढई हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेतून समाज कार्यात सहभागी होत आलेले आहेत. ते मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान पाहता ईतर गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी, गावगाडा चालवणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांना संघटीत करून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या विकासात्मक, रचनात्मक कार्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल खासदार बाळुभाऊ धानोरकर, पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे यासह ओबीसी आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *