हंसराज अहिर यांच्या नेतृत्वा त दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा।                               

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

                         यवतमाळ।दि 1नोव्हेंबर2021 👉 न्यायहक्काच्या मागण्यांसाठी आर्णी जि यवतमाळ येथे भाजपा आर्णी तालुका च्या वतीने दि ०१ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे शेतकऱ्यांचे कैवारी नेते पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नेतृत्व करून राज्य सरकारने ओला दुष्काळाची घोषणा करावी, प्रति हेक्टरी ५० हजाराची शेतकऱ्यांना मदत द्यावी, विम्याची राशी सरसकट द्यावी, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणेनुसार ५० हजार मदत तातडीने द्यावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. यावेळी आमदार एड. निलय नाईक, आमदार श्री संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, राजेंद्र डांगे, उद्धवराव येरमे, दिनकर पावडे, राजाभाऊ पडगिलवार, विपीन राठोड यांचेसह भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोर्च्यात सहभागी झाले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *