अस्तित्वात नसलेल्या एसटी बस चे राखीव तिकीट. *महिला व मुले प्रवाशांना विनाकारण मनस्ताप*.

 

लोकदर्शन मुंबई 👉-गुरुनाथ तिरपणकर

दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी आपला प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक जन आपले राखीव तिकीट बुक करून ठेवतात असेच चाकण राजगुरूनगर साठी जाणाऱ्या लोकांनी आपले राखीव तिकीट बुक केले असता मंगळवारी नेरूळ, पनवेल ह्या ठिकाणी गाडीची वाट पहात होते. गाडीची वेळ सकाळी अंधेरी वरून ७ वाजता सुटणार व पनवेल ८: ०५ ला पनवेल येण्याच्या वेळेनुसार अनेक लोक, महिला,मुले गाडीची वाट पहात होते परंतु १० वाजले तरी गाडी येत नाही म्हणून *सौ. वृषाली उबाळे* ह्या महिला प्रवाशी यांनी राजगुरू नगर डेपो ला सदर गाडी ची माहिती विचारली तर सदर गाडी कोरोना काळापासून बंद केली असल्याचे उत्तर दिले सदर बाब लक्षात येताच सर्वच प्रवाशी दुःखी झाले येणाऱ्या सर्व गाड्या भरून येत असल्यामुळे राखीव तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाच्या चुकीची शिक्षा मात्र भोगण्याची वेळ आली सदर बाबीची दाखल घेत *श्री.आण्णासाहेब एकनाथ आहेर (पत्रकार)* यांनी दखल घेत पनवेल डेपोतील मा. एस टी राजे यांना सदर बाबीची दखल घेऊन राखीव तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांची पर्यायी दुसऱ्या बस मधून त्यांना प्रवास करण्यास परवानगी देऊन तशी व्यवस्था करण्याचे सूचित केले व त्यांनी बाबीची सदर दखल घेत चाकण, राजगुरुनगर ला जाणाऱ्या प्रवाशांना इतर बस मधून जाण्यासाठी चालक, वाहक यांना दिवाळीत सहकार्य करण्याची विनंती करत राखीव तिकीट प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करून देत श्री.आहेर यांनी वाहक चालक यांचे आभार व्यक्त करत एसटी महामंडळ कडून घडलेल्या चुकीमुळे प्रवास करणाऱ्या लोकांना राखीव तिकीट असूनही काहीना वेळचाअपव्यय व उभ्याने प्रवास तर काहीना सहकार्य भावनेने जागा उपलब्ध करण्याचा विनाकारण त्रास झाल्याचे सांगत सदर बाबीची चौकशी व्हावी व पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी एसटी महामंडळाने घ्यावी असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here