राज्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या गोमेवाडीच्या खेळाडू मुलींचे सुयश कौतुकास्पद .

लोकदर्शन 👉 राहुल खरात

– जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे . ‘ चालणे ‘ . या क्रिडाप्रकारात गोमेवाडीच्या खेळाडू मुलींची राज्यस्पर्धेसाठी झालेली निवड गावच्या नावलौकिकात भर घालणारी व कौतुकास्पद आहे . असे मत जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांनी व्यक्त केले .
सातारा येथे झालेल्या विभागीय क्रिडास्पर्धेत आरती संतोष काळे या मुलीला प्रथम क्रमांक मिळाला . तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . पुजा संतोष काळे या मुलीला तिसरा क्रमांक मिळाला . या जुळया भगिनींनी सुयश संपादन केल्यामुळे त्यांचा व त्यांच्या पालकांचा गोमेवाडी केंद्रातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमेवाडी येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . यावेळी जेष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते सुनील दबडे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथाकथनकार व गोमेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख जीवन सावंत होते .
यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध गझलकार सुधाकर इनामदार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक मोटे , उपाध्यक्ष सोमनाथ झेंडे , सदस्या सविता जवळे , रमाकांत सोहनी, साहेबराव कदम, विमल काळे , परशुराम क्षिरसागर, गणेश कणसे तसेच शिक्षक उपस्थित होते .
यावेळी सुयश संपादन केलेल्या दोन्ही खेळाडू मुलींचा भेट वस्तू व मानाचा फेटा देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तसेच मुलींचे पालक संतोष काळे व कुटुंबियांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला . यावेळी सुनील दबडे व साहेबराव कदम यांनी प्रत्येकी एक हजार रुपये सत्कारमूर्ती खेळाडूंना भेट म्हणून दिले . यावेळी सुधाकर इनामदार, जीवन सावंत , दिपक मोटे , गणेश कणसे, सविता जवळे यांनी मनोगत व्यक्त केले . सुयश संपादन केलेल्या दोन्ही खेळाडू मुली जिल्हा परिषद गोमेवाडी शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत . त्या सध्या गजानन हायस्कूलमध्ये शिकत आहेत . यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे गजानन हायस्कूलचे क्रिडाशिक्षक घेरडे सर , मुख्याध्यापक कांबळे सर , सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले . सुत्रसंचालन मोटे व आभार कवडे सर यांनी मानले . खेळाडू मुलींनी मिळविलेल्या सुयशाबद्दल त्यांचे गोमेवाडी परिसरातून कौतुक केले जात आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *