लोकदर्शन विभागीय प्रतिनिधी👉 राहुल खरात
विटा ;
४० वे ग्रामीण मराठी साहित्य
संमेलन विटा ता, खानापूर जिल्हा सांगली येथे दिनांक ३/३/२०२२ रोजी थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे शासनाने यथोचित स्मारक सन्मानाने उभे करावे म्हणून सर्व संमती ने साहित्य संमेलनात ठराव मंजूर करण्यात आला आहे तो ठराव मा, जिल्हा धिकारी सो सांगली व मा, ना, उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच मा,ना , जंयत पाटील साहेब पालक मंत्री सांगली यांना डॉ शंकरराव खरात ह्यांच्या कार्याचा गौरव स्मरण करणारे स्मारक शासनाने त्याच्या जन्मशताब्दी वर्षात लवकरच उभे करावे म्हणून ठराव पाठवले आहे
४०, वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन विटा,ता, खानापूर जिल्हा सांगली येथे दिनांक ३/३/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते सदर च्या साहित्य संमेलनात थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे त्यांच्या जन्मभूमी त प्रेरणादायी , यथोचित स्मारक सन्मानाने उभे करावे म्हणून सर्व संमती ने ठराव मंजूर करण्यात आला आहे त्याबद्दल मा, रघुराज मेटकरी अध्यक्ष ग्रामीण मराठी साहित्य संमेलन विटा व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद आभार मानतो कळावे आयु विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली