बंदच राहतील जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*⭕सोमवार नंतर होणार निर्णय*

*⭕जिल्हाधिकारी गुल्हाणे यांची माहिती.*
शासनाने सोमवार पासून राज्यातील शाळा महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली असली तरी,जिल्हा प्रशासनासला तश्या कोणत्याही अधिकृत लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने,जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय तूर्तास बंदच राहतील.या विषयावर सोमवार(24जानेवारी,)ननंतर घेण्यात येईल,अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांनी शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला म्हणून सोमवार(24जानेवारी)पासुन इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतचे शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.या निर्णयाचे सर्वस्तरावर स्वागत झाले.आणि शाळा महाविद्यालयाने जोरदार तयारी केली.सर्व सुरू ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण व परीक्षेची सक्ती का..?असा प्रश्न विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी उपस्थित केला होता.शाळेतच कोरोना पसरतो का..?असेही अनेकांचे म्हणणे होते.यावर गंभीर विचार करून सोमवार पासून शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले,परंतु वृत्त लिहिस्तोवर असा कोणताही आदेश जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त न झाल्याने,चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय तूर्तास बंदच राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढील आदेश निर्गमित होत पर्यंत विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाईनच रहावे लागणार आहे.
वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात आदेश प्राप्त झाल्यावर कोविड टास्क फोर्स व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे सोबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असेही जिल्हाधिकारी गुल्हाणे म्हणाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *