भारतीय संविधानाचे तत्व बहुजनहिताय बहुजनसुखाय : ॲड. शंकरराव सागोरे

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर :
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार यांनी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय संविधानात अंतर्भूत केले आहे.बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तत्त्वज्ञान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द तत्वज्ञानातील घेतले आहे असे विचार ॲड.शंकरराव सागोरे यांनी बौध्द धम्म जागतिक धम्म ध्वज दिन समारोह प्रसंगी पंचशील युग प्रवर्तक बहुहितकारी संस्था
हरदोना,च्या वतीने बुध्द भूमी,गडचांदूर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधान आणि बौध्द धम्म या विषयावर मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.सत्यविजय उराडे होते.उराडे आपल्या भाषणातून म्हणाले की या बुध्द भूमीचा विकास करण्यासाठी बौध्द जनतेची तसेच शासनाची मदत अनिवार्य आहे तेव्हाच विकास होईल.अपेक्षा पिंपळे यांनीही विचार मांडले.संस्थेचे अध्यक्ष गौतम भसारकर,दशरथ डांगे,नामदेव हस्ते,प्रकाश भसारकर,कचरू जगताप,किशोर डोंगरे,किशन मेश्राम,चंद्रमणी उमरे यांची
कार्यक्रमात उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *