केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी* यांची*श्री हंसराजजी अहिर*यांनी *नवी दिल्ली* येथे भेट घेतली.!           

   लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर       

   नवी दिल्ली ÷ माननीय केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी* यांचेसोबत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री *श्री हंसराजजी अहिर* यांनी *नवी दिल्ली* येथे भेट घेतली. बल्लारशाह येथील पिटलाईन पूर्ण झाल्याबरोबर *बल्लारशाह ते मुंबई* थेट रेल्वे गाडी सुरु करीत असल्याबद्दल आभार मानले. ही गाडी *CSMT* पासून सुरु करण्याची व वेळ बदलविण्याची मागणी केली. सोबतच सध्या सुरु असलेली *पुणे ट्रेन* बल्लारशाह येथून आठवड्यातून ३ दिवस सुरु करणे, ताडोबा एक्स्प्रेस व्हाया माजरी-आदिलाबाद सुरु करणे, बल्लारशाह-वर्धा पॅसेंजर नागपूर पर्यंत करणे, वर्धा-अमरावती पॅसेंजर गाडी बल्लारशाह पर्यंत करणे, जनरल तिकीट सुरु करणे, बंद असलेल्या पॅसेंजर सुरु करणे, गोंदिया-बल्लारपूर पॅसेंजर गाडीच्या फेऱ्या वाढविणे, बंद असलेली जबलपूर-चांदा फोर्ट गाडी सुरु करणे, चंद्रपूर रेल्वे स्थानकावर सर्व सुपरफास्ट गाड्यांचे थांबे देणे, दक्षिण भागातून कागजनगर पर्यंत येणाऱ्या सर्व गाड्यांचा विस्तार बल्लारशाह पर्यंत करणे, चंद्रपूर-चांदा फोर्ट रेल्वे लाईन तसेच चंद्रपूर,बल्लारशाह,चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावरील समस्यांबाबत व अन्य विषयावर सविस्तर चर्चा केली. मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *