लोकदर्शन👉 मोहन भारती
तालुका :– राज्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करीत सहाय कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत २०२२- २३ रब्बी हंगामातील विविध विषयावर चर्चा व अमलबजावणी करण्याकरिता तालुका स्तरावर शेतकरी सल्लागार समितीची सभा तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आली होती.
या प्रसंगी आत्मा समितीचे अध्यक्ष श्री तिरुपती इंदुरवार, नंदू वाढई सरपंच कलमना, लहू चाहरे हनुमंत रणदिवे, पिंगे यासह सर्व आत्मा समितीचे सदस्य उपस्थित होते.
या सभेत रब्बी हंगामातील पिका संदर्भात तालुका कृषी अधिकारी चव्हाण तसेच मंडळ अधिकारी मॅक्कपाले व आत्मा समितीचे सचिव चंदनबट्वे इत्यादींनी योग्यरीत्या मार्गदर्शन केले.