छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे गरजेचे,, ,,प्राचार्या स्मिता चिताडे।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,,
जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकविणारे,प्रत्येक स्त्री ला मानाचे स्थान देऊन आदर करणाऱ्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकांनी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्या सौ, स्मिताताई चिताडे यांनी शिवजयंती निमित्ताने महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले,
प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक एच.बी.मस्की,सौ,शोभा जीवतोडे, एम. सी.व्ही. सी.विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, होते,
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.याप्रसंगी प्रा, प्रदीप परसुटकर ,वामन टेकाम, प्रा, रोशन मेश्राम यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्य वर प्रकाश टाकला.
संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा, नरेंद्र हेपट यांनी केले.कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here