,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राज्य शासनाने दिव्यांग व्यक्ती ला देण्यात येणाऱ्या मानधन मध्ये वाढ करून 1500 रुपये करण्याचा निर्णय घेऊन दर महिन्याला 5 तारखेला दिव्यांग व्यक्ती च्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्रगेल्या 4 ते 5 महिन्यापासून अनुदान देण्यात आले नाही त्यामुळे दिव्यांग व्यक्ती मध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे, येत्या 8 दिवसात अनुदान दिले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार दिव्यांग क्रांती चे जिल्हा अध्यक्ष पंकज माणुसमारे (गडचांदूर)यांनी तहसीलदार, बल्लारपूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,8 दिवसात अनुदान देण्यात आले नाही तर दिव्यांग बांधव आपली दिवाळी तहसील कार्यालयात साजरी करेल असे निवेदनात म्हटले आहे
निवेदन सादर केले तेव्हा सरलाताई गेडाम,रंजू दुपारे,सिध्दार्थ टिपले,विकास भगत,गिरीजा बाई,उपस्थित होत्या,
दिवाळी पूर्वी शासन दिव्यांग व्यक्ती च्या खात्यात अनुदान जमा करते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत