अमरावती तहसील कार्यालय येथे आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण* *फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारातून पुरोगामी महाराष्ट्राची जडण घडण* *महाराष्ट्र दिन कार्यक्रमात आ. सौ . सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन                                                             

लोकदर्शन👉 मोहन भारती


*अमरावती ०१ मे* महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त अमरावती तहसील कार्यालय येथे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगान करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली . यावेळी आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांसह अमरावतीकर नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले , तहसीलदार संतोष काकडे , नायब तहसीलदार दिनेश बढीये , सुनिता रासेकर , नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, प्रवीण ढोले, आदींसह अमरावती तहसील मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . फुले शाहू आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांतून पुरोगामी महाराष्ट्राची जडण घडण झाली . पाहता पाहता ६२ वर्षाचा काळ लोटला असतांना महाराष्टाने सर्वच क्षेत्रात प्रगती साधली . शेती , उद्योग , शिक्षण , क्रीडा , क्षेत्रात अग्रणी राहून आज लोककल्याणाची संकल्पना राबवून लोकाभिमुख शासन व प्रशासन पारदर्शकपणे व गतीने काम करत आहे. अमरावती मध्ये सुद्धा विकासाचे पर्व नांदत असून नावीन्य पूर्ण विकासातून शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोरोना काळानंतर आता सर्वच यंत्रणा व जनजीवन पूर्वपदावर आले असून श्रमजीवी घटकाला सुद्धा न्याय देण्यात येऊन विकासाची संकल्पना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचाव्यात यश मिळाले असल्याचे प्रशंसनीय गौरवोद्गार आ. सौ , सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले . यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनी महाराष्ट्राच्या गौरव व लौकिका बाबत माहिती दिली . तर तहसीलदार संतोष काकडे यांनी लोकाभिमुख प्रसाशन व गतिमान विकासावर संबोधन करून जनकल्याणाची संकल्पना विशद केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here