लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून त्यांना अजुन पर्यंत पिकं विमा कंपनीतर्फे नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि चंद्रपूर जिल्ह्याल्या यादीतून वगळण्यात आले होते. तेव्हा या प्रकरणाची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षांचे जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर जिल्हा अध्यक्ष शेरखान पठाण व अक्षय बोंडगुलवार, अमित यादव, अमोल सहस्रबुद्धे व अनेक पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेऊन जिल्हयातील सर्व सोयाबीन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिकं विम्याची रक्कम त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल याची खात्री दिली आहे.
तसेच चंद्रपूर जिल्ह्याला ८ करोड मिळाले असून उर्वरित १५ करोड लवकरच मिळणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तरी पण शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकरात लवकर न मिळाल्यास प्रहार पार्टी शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार असा इशाराही प्रहार तर्फे देण्यात आला आहे.