महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ध्वजारोहण

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,विद्या मंदिर, स्कॉलर अकॅडमी गडचांदूर येथे 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने 13 ऑगस्ट ला सकाळी शाळेच्या पटांगणात ध्वजारोहण मुख्याध्यापीका तथा प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे, प्राचार्य रामकृष्ण पटले,प्राचार्या रश्मी भालेराव, उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले,याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन प्राचार्या स्मिता चिताडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here