दिराच्या लग्नाच्या दिवशीच वहिनीने घेतले विष

By : Shankar Tadas
गडचांदूर / कोरपना : घरी दिराचे लग्न असताना झालेल्या घरगुती वादातून वहिनीने विष घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचांदूर येथे घडली.
सुशीला रामकृष्ण सोयाम (30 वर्षे ) मूळ गाव बोरी नवेगाव असे मृतक महिलेचे नाव असून यापूर्वी ती आपल्या माहेरी घुघूस येथे पतीसह राहत होती. तिला 12 वर्षीय मुलगा व आठ वर्षांची मुलगी आहे.
प्राप्त माहिती नुसार, कोरपना तालुक्यातील बोरी नवेगाव येथील सोयाम परिवाराचा विवाह समारंभ 28 एप्रिल रोजी होता. जवळील चनई येथे वरात जाणार होती. सकाळी वरातीची तयारी सुरू असताना वराची सुवासिन होण्यासाठी वहिनी सुशीला हिने हट्ट केल्याने वादविवाद झाला. यात सकाळी साडेआठ वाजता रागाने ती गडचांदूर येथील आपल्या खोलीवर एकटीच निघून गेली व तिथे विष घेतले. याबद्दल कुटुंबियांना कळले असता प्रथम गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. मृतक महिलेची बहीणही गडचांदूरला राहत असल्याने दोन्ही मुले तिथेच होती. घटनेची नोंद गडचांदूर पोलिसांनी घेतली असून पोस्टमार्टमनंतर बोरी नवेगाव येथे पतीच्या मूळ गावी अंत्यविधी आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *