,,,,,,,,,,,,,,,,लोकदर्शन देऊळगाव राजा👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठी साहित्य मंडळ आयोजित सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 31 मार्च ला लोणार तालुक्यातील हिरडव येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालया च्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले,या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पत्रकार भूषण पुरस्कार जेष्ठ पत्रकार प्रा अशोक डोईफोडे यांना मराठी साहित्य मंडळ चे संस्थापक जेष्ठ साहित्यिक मां डॉ जयप्रकाश घुमटकर, उर्फ कवी गोलघुमट , यांच्या हस्ते देऊन सपत्नीक गौरविण्यात आले ,
संमेनाध्यक्ष जेष्ठ कवी लेखक मा सुरेश लोहार,कराड होते, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे, नाशिक, ॲड निता कचवे, अमरावती,निता चीकारे ,नागपुर, जेष्ठ लेखक,कवी डी आर बांगर, लोणार, संस्था सचिव प्रकाश पोफले , प्राचार्य पंढरी जायभाये, सेवानिवृत्त गट विकास अधिकारी गजानन पाटोळे, सरपंच साधना पोफले ,अशोकराव घायाळ पाटील,तथा इतर उपस्थीत होते, कार्यक्रमा चे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक प्रा डॉ रत्नाकर मुळीक, नागपूर यांनी केले, कार्यक्रमात महाराष्ट्रातील साहित्यिक,कवी, लेखक, पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते,