तामिळनाडूमध्ये रथयात्रे दरम्यान विजेच्या धक्क्याने ११ जणांचा मृत्यू , १५ जण जखमी, खुल्या तारांना रथाचा स्पर्श झाल्याने झाली दुर्घटना

⭕तंजावर इथल्या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदीं यांनी मदत जाहीर केली आहे।                          लोकदर्शन 👉 मोहन भारती

एप्रिल 27, 2022

तंजावर इथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास दुर्घटना घडली. ५० पेक्षा जास्त जण रथ ओढत असतांना रथाच्या कळसाचा स्पर्श उघड्या वीजवाहक तारांना झाल्याने बसलेल्या वीजेच्या झटक्यात २५ पेक्षा जास्त होरपळून निघाले. या दुर्घटनेत ७ जणांचा तात्काळ मृत्यु झाला, तर चार जण उपचारादरम्यान दगावले असून १५ जण जखमी झाले आहेत, जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here