20 कोटी वर्षांपूर्वीची वनस्पती जिवाष्मे सापडली

by : Shankar Tadas

* सुरेशजी चोपने यांनी दिली माहिती

चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती जवळ सापडली २० कोटी वर्ष दरम्यानची पानांची जिवाष्मे आढळून आली. चंद्रपुर तालुक्यातील भद्रावती जवळ जुरासिक ते पर्मियन ह्या 28 ते 19.5 कोटी वर्षादरम्यानच्या काळातील ग्लासोप्टेरिस (Glassopteris) ह्या प्रजातीच्या वनस्पती पानांची सुंदर जिवाष्मे मिळाली आहेत. ह्यापूर्वी डायनोसॉर,हत्ती,स्ट्रोमॅटोलाईट,शंख शिंपले , वृक्ष आणि पानांचे जिवाष्मे चंद्रपुर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोधून काढली आहेत. भद्रावती जवळ शेती आणि जंगलात काही ठिकाणी ही अतिप्राचीन पुरावे सापडली आहेत.भद्रावती आणि वरोरा परिसरात पूर्वी डायनोसॉर ची जिवाष्मे आढळली होती .आता ह्या त्याहीपेक्षा जुन्या २० कोटी वर्षे जुन्या जुरासिक काळातील जिवाष्मे आढळल्यामुळें नवीन इतिहासाला उजाळा मिळाला आहे. ह्या परिसरात जिवाष्मे असल्याची भूशास्त्र विभागाची नोंद होती परंतू चांगली जिवाष्मे मिळाली नव्हती
चंद्रपुर जिल्हा हा भूशास्त्रीय दृष्ट्या एक संग्रहालय असून येथे ३०० ते ६ कोटी वर्षे जुने बहुतेक प्रकारची खडक आढळतात,तर २५ कोटी ते २५ हजार वर्षे प्राचीन जिवाष्मे आढळतात.
२० कोटी वर्षादरम्यान जेव्हा हे वृक्ष जिवंत होती आणि विशाल डायनोसॉर जिवंत होते तेव्हा पृथ्वीवर पांजिया नावाचा एकच खंड होता आणि भारत हा भूप्रदेश आजच्या आस्ट्रेलिया ला लागून होता.प्राचीन भारताच्या आणि चीनच्या मध्ये टेथीस नावाचा समुद्र होता.पुढे कोट्यवधी वर्षाने भारताचा भूखंड उत्तरेला सरकत गेला आणि चीनच्या भूखंडाला टककर दिली.ह्यातून हिमालय निर्माण झाला.अजूनही भूकवचाची ही गती उत्तरेकडे सरकत आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील भूगर्भात अजून असे अनेक रहस्य दडलेली असून भूशास्त्र विभागाने आणि संशोधकानी सविस्तर संशोधन केल्यास भविष्यात ती दृष्टीपटात येतील.

माहिती सौजन्य : संशोधक सुरेशजी चोपने यांची फेसबुक पोस्ट

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here