शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा : सरकारच्या दिशाभूल कारभाराविरोधात कोरपना काँग्रेसचा हल्लाबोल

लोकदर्शन कोरपना 👉मोहन भारती

शेतकरी, तरुण, महिला व सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या महायुती सरकारला जागं करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कोरपना येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले.

सरकारने जाहीरनाम्यातील आश्वासने पाळली नाहीत, शेतकरी व जनतेची फसवणूक होत आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे धोटे यांनी भाषणात स्पष्ट केले. “जर शासनाने तातडीने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर काँग्रेस उग्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

मोर्चात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती

कापूस पिकासाठी हेक्टरी ₹१ लाख तर सोयाबीनसाठी ₹५० हजार मदत

पिक विमा रकमेची तातडीने अंमलबजावणी

युरिया व कॉम्प्लेक्स खतांचा पुरवठा

निराधार व वृद्धापकाळ पेन्शन ₹२५००

स्थानिक तरुणांना रोजगार

“लाडकी बहीण” योजनेचे पोर्टल सुरु करणे

ओला दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई

बेरोजगार युवकांचे थकित मानधन

कोरपना उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरु करणे

कृषीपंपांना किमान १२ तास वीजपुरवठा

वनहक्क प्रकरणे तातडीने मंजूर करणे

देवघाट टोलनाक्याची टोलमाफी

घरगुती वीजबिलातील वाढ व स्मार्ट मीटर सक्ती रद्द करणे

घरकुल योजनेंतर्गत वगळलेल्यांना समाविष्ट करणे

नवीन आरोग्य केंद्रे व वसतिगृहे सुरु करणे

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अनुदान

महिला बचत गटांना व्याजमाफी

एसटी व बससेवेतील सुधारणा

या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले.

मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयराव बावणे, विठ्ठलराव थिपे, उत्तमराव पेचे, दिनकरराव मालेकर, श्यामभाऊ रणदिवे, संभाजी कोव्हे, प्रा. आशिष देरकर, आशाताई खासरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here