गडचांदूर : प्रा. अशोक डोईफोडे
चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्रात केंद्र शासन शी निगडीत अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते प्रश्न नव्या खासदाराकडून सोडवले जाणे अपेक्षित आहे. यात कृषी, सिंचन, आरोग्य शिक्षण,प्रदूषण , उद्योग , महामार्ग, रेल्वे , नागरी उद्ययन, पुरातत्व , गृह, वन,अर्थ खात्याशी संबंधित अनेक बाबी आहे. कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने कापूस व धान संशोधन केंद्र, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल पार्क निर्मिती, सिंचनाच्या दृष्टीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करणे , पहाड व दुर्गम भागात नवीन सिंचन प्रकल्प उभारणी, जुने प्रकलपाचा पूर्ण विकास, पैनगंगा वर्धा वैनगंगा विदर्भा, निगुर्डा, अंधारी , इरई, झरपट, शिरना नदीवर बरेज बंधारे बांधणे, आरोग्य विषयक केंद्रीय स्तरावरील आरोग्य संस्था स्थापन करणे , शैक्षणिक दृष्ट्या सीबीएससी पॅटर्न अंतर्भूत केंद्रीय शैक्षणिक संस्था उभारणी , सर्व घटकातील विद्यार्थ्यांना वस्तीगृह निर्मिती, प्रदूषणावर पाय बंद घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना , नव्या पर्यावरण पूरक उद्योगाची उभारणी , उद्योगातील कामगाराचे प्रश्न , आय टी पार्क निर्मिती , परतवाडा – अमरावती – नेर – यवतमाळ – करजी – वणी – घुघुस – चंद्रपूर , कोरपना – वणी , तेलंगणा राज्यातील आसिफाबाद राष्ट्रीय महामार्ग पासून भारी – जिवती – येल्लापुर – आदिलाबाद , गोंडपिपरी – मुल , पांढरकवडा – घाटंजी – यवतमाळ मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून परावर्तित करणे , गडचांदूर – आदिलाबाद , मुल – गडचिरोली , बल्लारपूर – सिरोंचा , वरोरा – चिमूर – उमरेड , गडचांदूर – मुकुटबन -पांढरकवडा – घाटंजी – आर्णी – यवतमाळ रेल्वे मार्ग , चंद्रपूर – चांदा फोर्ट रेल्वे स्थानके जोडणी , सेवाग्राम ,नंदिग्राम रेल्वे गाडी, गोंदिया – बल्लारपूर बंद असलेल्या रेल्वे फेऱ्या पूर्ववत सुरू करणे, चंद्रपूर ,वरोरा ,भद्रावती, वणी ,मांजरी, विसापूर , माणिकगड ( चूनाला ), बल्लारपूर रेल्वे स्थानकावर न थांबणाऱ्या रेल्वेना थांबा मिळवून देणे , लोकसभा क्षेत्रातील रेल्वे स्थानक व माल धक्याचा अत्याधुनिक पायाभूत विकास , चंद्रपूर – नागपूर , गडचांदूर – नागपूर, गोंदिया – गडचांदुर शटल ट्रेन सुरु करणे , बाबुपेठ, राजुरा , विसापूर, देऊळवाडा, राजोली , मुल, गडचंदुर, वणी येथील रेल्वे मार्गावर उडानपूल , चंद्रपूर शहरातील मोरवा व प्रस्तावित मूर्ती विमानतळाचा विकास करणे , प्रवासी वाहतूक विमान सुरू करणे , पुरातत्व विभागाशी संबंधित नोदः नसलेल्या संपूर्ण ऐतिहासिक स्थळाचे पुरातत्व दप्तरी नोंद करणे , त्या स्थळांचा विकास घडवून आणणे , किल्ले , सराय, बुरुज आदी ऐतिहासिक बाबींचे संवर्धन होण्यासाठी उपाय योजना , चंद्रपूर , भद्रावती, वणी , राजुरा येथे संग्राहलय निर्मिती , महाराष्ट्र तेलंगाना सीमा वादात अडकलेल्या जीवती तालुक्यातील चौदा गावाचा प्रश्न निकाली काढणे , घोषित झालेल्या वन जमिनीचा प्रश्न सोडविणे , गरजूंना जमिनीचे पट्टे वाटप करणे , कोरपना , जिवती , झरी जामनी या तीन तालुका स्थरावर राष्ट्रीयकृत बँक स्थापन करणे , जिवती , झरी येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, व्यायाम शाळा निर्मिती, बी एस एन एल यंत्रणेचे पुनर्जीवन , प्रत्येक गावातील पोस्ट कार्यालयाला स्वतंत्र हक्काच्या इमारतीची निर्मिती, चंद्रपूर, बल्लारपूर ,वरोरा ,वणी, भद्रावती येथे असलेल्या केंद्र शासनाची निगडीत संस्थांचा, ताडोबा अंधारी , टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प, लोकसभा क्षेत्रातील
तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ , जागतिक दर्जाचा विकास, केंद्रीय कल्याणकारी योजना प्रसार व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे ,ग्रामीण भागात रस्ते , स्वच्छ पिण्याचे पाणी आदी सोयीच्या उपलब्धता करून देणे, जिवती व झरी जामनी हे अतिदुर्गम अविकसित तालुके दत्तक घेऊन पायाभूत सुविधा विकसित करणे आदी प्रमुख मुद्दे असणार आहे.