नागपूर 👉 प्रतिनिधी
नागपूर, १९ जून २०२५ – राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) नागपूर विभागातर्फे “वन नेशन, वन इलेक्शन – लोकशाही सुधारणा की घटनाविरोधी केंद्रीकरण?” या अत्यंत चर्चिल विषयावर भव्य वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १८ ते २० उत्साही वक्त्यांनी सहभाग घेतला आणि विषयाच्या बाजू व विरोधात सुसंगत व प्रभावी मुद्दे मांडले.
या कार्यक्रमाच्या यशामध्ये एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी आपल्या अथक मेहनतीने व नियोजनशक्तीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रम संयोजनात देव, क्यावल, गौरी, भारती, मोहित, कात्रे आणि पीयूष अग्रवाल या कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या समर्पणामुळे स्पर्धेचा एकूण दर्जा उंचावला आणि उपस्थित श्रोत्यांना वैचारिक सुसंवादाचा उत्तम अनुभव मिळाला.
कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून स्वरादेवी यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मुद्देसूद विश्लेषणामुळे स्पर्धकांना न्याय मिळाला आणि निकालावर सर्वांनी समाधान व्यक्त केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे:
🥇 प्रथम क्रमांक – पीयूष अग्रवाल
🥈 द्वितीय क्रमांक – शोभिता मलिक
दोघांचंही वक्तृत्व ठाम, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी ठरलं.
कार्यक्रमाची सांगता करताना एनएसयूआय पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमधील राजकीय जागरूकता वाढवण्यासाठी अशा स्पर्धा गरजेच्या असून, यापुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.